थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

मराठी मुली लग्न का करतात ?





1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी....?

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......?

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........?

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी.....?

5) आई-बापावर दया करण्यासाठी.....?


6) मैत्रिणीने केले मग मी का नको...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून.........?

8 ) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून.........?

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार.......?

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी......?

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे , फेअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय ???